Skip to main content

INTRODUCTION

  Hello Friends, My mission is to educate the people. This is One of The Platform, where you can get the information of Various Fields in Marathi (one of the indian language).   I am doing Research, Studying and Writing the various scientific and Authentic Information. The Students  or Individual from anywhere ,can easily understand the " Basic Concepts  " in their Mother tongue. These blog's have emphasis on Development of " scientific Temper " or " an attitude of reasoning and questioning "  on different things in the people of India. Thank you

मनुष्य शाकाहारी आहे की मांसाहारी आहे ??

 मनुष्य शाकाहारी आहे की मांसाहारी आहे ??

अनेकांना हा प्रश्न पडला असेल, की माणूस हा शाकाहारी आहे की मांसाहारी आहे ? मनुष्य हा एक बहुपेशीय सजीव आहे, तसेच इतर प्राणी आणि वनस्पती हे देखील बहुपेशीय सजीव आहेत..आपल्या शरीरात अब्जावधी पेशी जगत असतात, ते पेशी सुध्दा सजीव असतात. त्यांना कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, व्हिटॅमिन, क्षार आणि पाणी हे जगण्यासाठी लागत असते..या अन्नपदार्थ मधून ऊर्जा उत्पन्न होत असते. अन्न आणि स्वसंरक्षणसाठी एक सजीव हा दुसऱ्या सजीवाला मारत असतो, ही एक अन्नसाखळी असते.

करोडो वर्ष पृथ्वीवर डायनासोरचे राज्य होते, ते सुद्धा दुसऱ्या जीवांना मारत होते. पृथ्वीवर अजून डायनासोर असते, तर मनुष्य तर सोडाच अनेक सस्तन प्राणी (Mammals) यांचे जगणे देखील मुश्किल झाले असते.. डार्विनच्या सिद्धांत नुसार, प्रत्येक जीव हा स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडत आला आहे.. संघर्ष हा निसर्गातील प्रतिकूल परिस्थितीशी असो किंवा एकमेकांशी असो.. प्रत्येक जीवाने संघर्ष करून इथपर्यंत प्रवास केला आहे. निसर्गातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये सजीव हा जगण्यासाठी जे काही मिळेल त्यावर जगत आला आहे. तसेच,वनस्पती हे पण सजीव आहेत. वनस्पतीवर जगणे हे पण एका जीवाची हत्या असते..

आपण मनुष्य शाकाहारी आहोत ? की मांसाहारी आहोत ? याचे उत्तर आपल्याला माणसाची उत्क्रांती (evolution) कशी झाली हे समजल्यावर लक्षात येते.. आपण माणसाचे पूर्वज म्हणजे "आदिमानव" हा काय खात होता हे समजून घेवू..

"आधुनिक मनुष्य" हा ज्याचा वंशज आहे , ते "होमो सेपियन" हा साधारण 2 लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात होता. "होमो सेपियन" पूर्वी 70 ते 80 लाख वर्षापासून "आदिमानव" च्या अनेक जाती अस्तिवात होत्या. त्यावेळी काही वानर हे दोन पायावर उभे राहू लागले .आदिमानव हा त्या वानर (ape) जातसमूहाचा वंशज आहे..  50 ते 60 वर्षांपूर्वी चा आदिमानव हा बहुतांश वेळा फळे, पाने, कंदमुळे यावर जगत होता. तसेच, तो "लहान प्राणी" व "कीटक" मारून कच्चे खात होता. यात ऑस्त्रोलोपेथिकस हा आदीमानव चा समावेश आहे. दोन पायावर उभे राहणारा आणि वानर पासून वेगळा असा हा आपला वास्तविक पूर्वज आहे.

"आदिमानव" मध्ये उत्क्रांती होत गेली, आणि पुढे "होमो बॅसिलस" व"होमो एरेक्ट्स"  यांचा काळात म्हणजे 40 लाख ते 15 लाख वर्षात आदिमानवला हळू हळू "लहान प्राणी" ते "मोठ्या प्राण्यांचे" मांस खाण्याची सवय लागली. "होमो एरेक्टस" चे काळात म्हणजे 18 लाख वर्ष पासून माणूस शिकार करू लागला.. "होमो एरेक्ट्स" याचे वैशिष्ट्य होते, की तो जास्त वेळ ताठ राहू शकत होता. त्याचे अगोदरच्या आदिमानवपेक्षा पाय हे हातपेक्षा लांब होते आणि मेंदूचा पण विकास होत होता.. प्राण्याची शिकार करण्यासाठी दगडापासून अवजारे बनवू लागला.  सुरुवातीला तो "कच्च मांस" खायचा, पण जेव्हा त्याने आग पेटवण्याची कला विकसित केली, तेव्हा तो मांस शिजवू लागला..

आपण असे म्हणू शकतो की, माणसाच्या आहारात प्रामुख्याने मांसाचा समावेश हा "होमो एरेक्ट्स" च्या काळात म्हणजे 18 लाख वर्षांपूर्वीपासून, तो शिकारी करू लागल्यापासून सुरू झाला. पुढे "होमो सेपियन" आणि "होमो नीअँडरथल" यांच्या आहारात शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ असायचे. "होमो सेपियन" व पुढे आधुनिक मानवाने शेती करण्याची कला विकसित केली. शिकारीची पद्धत विकसित केली..धातूपासून अवजारे बनवू लागला. पाळीव प्राणी पाळू लागला. त्यांच्या पासून दूध मिळवू लागला...शेती करणे, मासेमारी करणे आणि शिकार करणे हे मानवाचे अन्नासाठी कार्य राहिले आहे..

म्हणून मनुष्य हा शाकाहारी व मांसाहारी असा दोन्ही आहे, तसेच,आपल्या शरीराला त्याची सवय आहे.

डॉ अलोक कदम

Comments

Popular posts

सेक्स करताना लिंग ताठ न होण्याची कारणे काय ? (Erectile Dysfunction)

सेक्स करताना लिंग ताठ न होण्याची कारणे काय ? (Erectile Dysfunction) पुरुषांमध्ये लिंग (शिश्न) ताठ होण्यामध्ये समस्या.... सेक्स करताना नॉर्मली पुरुषांमध्ये काम उत्तेजना निर्माण होऊन लिंग ताठ होते. मात्र, काही पुरुषांमध्ये लिंग (penis) ताठरता होण्यासंदर्भात समस्या निर्माण होतात.. काही पुरुषांचे लिंग (शिश्न) ताठ होत नाही . काही पुरुषांचे शिश्न ताठ होते मात्र तर जास्त वेळ ताठरता टिकत नाही त्यामुळे स्त्रीच्या योनी (vagina) मध्ये घुसवताना समस्या निर्माण होते..काही पुरुषांचे लिंग ताठ होते,योनी मध्ये  घुसवल्यावर जास्त वेळ लिंग ताठ राहत नाही..म्हणून सेक्स चा आनंद दोघानाही घेता येत नाही... यामुळे पुरुषांचा मनात एक नकारात्मक आणि लाजिरवाणा दृष्टिकोन निर्माण होतो. स्त्रीला देखील  असमाधान वाटल्याने दोघांच्या नात्यामध्ये दुरावा उत्पन्न होते.. ही समस्या का निर्माण होते.. ?  सामान्यतः याची दोन प्रमुख कारणे आहे. एक शारीरिक व दुसरे मानसिक कारण आहे.. शारीरिक कारण मध्ये तुम्हाला कोणतही दीर्घकालीन आजार असतील ,जसे डायबेटिस , बीपी, कोलेस्टेरॉल, ओबेसिटी, अथेरोस्कलेरोसीस, अल्कोहोल सिगारेट चे अतिस...

मिलिंद प्रश्न

  मिलिंद प्रश्न  "मिलिंद प्रश्न " भारतीय साहित्यमधील  प्रसिद्ध पुस्तक आहे. जसे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन या गुरू-शिष्य यांच्या संवाद वर "भगवतगीता " हा ग्रंथ हा आधारित आहे. जसे अष्टावक्र आणि राजा जनक या गुरु शिष्य वर आधारित "अष्टावक्रगीता" हा ग्रंथ आहे..तसा बौद्ध भिखु नागसेन आणि राजा मिनांडर (मिलिंद) या गुरू-शिष्य  यांच्यातील संवाद वर आधारित "मिलिंद प्रश्न" हा प्रसिद्ध ग्रंथ आहे.. राजा मिनांडर (मिलिंद) हा "बॅक्ट्रिया" चा इंडो-ग्रीक शासक होता. इसवी सन पूर्व 206 ते इसवी सन पूर्व 140 चे दरम्यान बॅक्ट्रीया म्हणजे आताचे ताजकिस्थान अफगाणिस्तान या प्रदेशवर राज्य करत होता. मिनांडर हा मूळचा ग्रीस देशाचा असून त्याचे साम्राज्य हे आताच्या अफगाणिस्तान पासून पाकिस्तान व पंजाब पर्यंत पसरले होते.मिनांडर हा खूप पराक्रमी राजा होताच ,त्या बरोबरच तो खूप हुशार ,वाद विवादात निपुण, तत्वज्ञानी आणि तार्किक होता.  त्याचा ग्रीक आणि भारतीय शास्त्र चा सखोल अभ्यास होता. त्याच्याशी वादविवाद करणे सोपे न्हवते. दुसरीकडे, भिखू नागसेन हे "अरहंत " पदावर पोहचलेले ...